Sunday, July 25, 2010

मरिलियर शॉट

सन २००२ मध्ये भारतात झालेली ती तिरंगी एकदिवशीय क्रिकेट मालिका मला अजुनही आठवतेय. झिम्बाब्वेचा संघही या मालिकेत सहभागी झाला होता. खरं तर हाच काळ झिम्बाब्वे क्रिकेटचा सुवर्णकाळ मानायला हवा. याच काळात झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये नील जॉन्सन, मरे गुडविन, ऍण्डी फ्लॉवर, ग्रांट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक, सारखे खेळाडू खेळत होते. तरीही हा संघ अन्य संघांच्या तुलनेत लिंबू टिंबूच मानला जायचा. २००२ च्या एका सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. त्या मानाने झिम्बाब्वे संघाने धावांचा पाठलाग करताना फारशी चुणूक दाखविली नाही. त्यांचा डाव भारताच्या गोलंदाजीपुढे ढेपाळत गेला. संघाच्या नऊ विकेट पडल्या असताना त्यांना चार-पाच ओव्हर्स मध्ये पन्नासच्या वर धावा हव्या होत्या. एका बाजूने झिम्बाब्वेचा ऑफ स्पिनर फलंदाज डग्लस मरिलियर फलंदाजी करत होता. म्हणजे जवळपास भारताच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी होती, असे म्हणायला हरकत नाही. भारतीय पाठिराखे विजयाचा आनंद व्यक्त करू लागले होते. शिवाय झिम्बाब्वेचे खेळाडूही विजयाची आशा संपवून पॅव्हेलियन सोडून गेलेले दिसले. भारत जिंकणार असे सर्वांनी गृहित धरले असताना डग्लस मरिलियरने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. हा ऑफ स्पिनर गोलंदाज इतकी छान फलंदाजी करत असेल, याची मला कल्पना नव्हती.

त्या दिवशी तो काय खावून आला होता कोण जाणे. उरलेल्या प्रत्येक चेंडूगणिक त्याने सामना भारताच्या खिशातून काढायला सुरूवात केली. त्यात त्याने एक वेगळ्या प्रकारच्या फटक्याचा (शॉटचा) वापर केला. चेंडू गोलंदाजाने टाकल्यावर थोडं स्टंपच्या पुढे जावून तो चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून तडकविण्याच्या नव्या शॉटचा प्रयोग त्याने करून दाखविला. झहीर खानच्या दोन षटकात त्याने या शॉटवर तीन षटकार ठोकून सामना झिम्बाब्वेच्या बाजूने वळविला. सामना जिंकण्यासाठी त्याचा हाच फटका मदतीस पडला. अगदी नाट्यमयरित्या झिम्बाब्वेने हा सामना जिंकला होता. तोही एक गडी राखून! क्रिकेटच्या इतिहासात अगदी कमी सामने केवळ एक गडी राखून विजयी झाले आहेत. त्यात हा सामना म्हणजे मला अगदीच विशेष वाटला. डग्लस मरिलियरची खरी ओळख मला त्या दिवशी पटली.
खरं तर डग्लस मरिलियरने या नव्या फटक्याचा सर्वप्रथम वापर ऑस्ट्रेलियात झालेल्या एका तिरंगी स्पर्धेत केला होता. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना झिम्बाब्वेला अंतिम षटकात १५ धावा विजयासाठी हव्या होत्या. ग्लेन मॅकग्राथ सारखा गोलंदाज गोलंदाजी करत होता. डग्लस मरिलियरने या अंतिम षटकात दोन वेळा त्याच्या नव्या शॉटचा वापर केला परंतू, त्याला केवळ १३ धावा बनवता आल्या. झिम्बाब्वेचा केवळ एका धावेने पराभव झाला! तेव्हापासून या शॉटलामरिलियर शॉटम्हणून संबोधले जाऊ लागले. क्रिकेटच्या कोणत्याही शब्दकोशात नसणारा हा एक आगळा-वेगळा फटका आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत न्युझीलंडच्या ब्रेंडन मॅकलम श्रीलंकेच्या दिल्शान तिलकरत्नेने या शॉटचा वापर केल्याचा दिसून आला. परंतू, डग्लस मरिलियरच या फटक्याचा खरा जन्मदाता म्हणून परिचित राहिल...

Monday, July 19, 2010

मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …


’फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर राज्याचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटिल यांनी जेम्स लेनच्या पुस्तकबंदीबाबत मांडलेली मते सर्वांनी वाचावित. याकरिता ती मी इथे पुनर्प्रकाशित करित आहे.

सुप्रभात,

जेम्स लेन यांच्या ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या संदर्भात माझी मते ठाम आहेत. काल एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रात जेम्स लेन यांच्या पुस्तकावर घातलेल्या बंदीसंदर्भात मी घेतलेला पुढाकार आणि त्याच वेळी माझ्या ब्लॉग वर मी माझ्या लोकशाही प्रेमाविषयी व्यक्त केलेला विचार हे परस्परविरोधी असल्याचे मत एका पत्रकाराने व्यक्त केले आहे. मी लोकशाही प्रेमी असल्याने मला त्यांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे.

त्यांच्या मताबद्दल आदर व्यक्त करून आणि माझे मत अबाधित ठेऊन मी नम्रपणे नमुद करू इच्छितो की “लोकशाही म्हणजे अराजक नव्हे”. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. तिचे मत हे अंतिम असते आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या या मताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जवळजवळ एकमताने या पुस्तकावर बंदी घालण्याचे मत व्यक्त केलेले आहे.

महाराजांविषयी अनुदगार काढणार्‍या त्या पुस्तकातील ‘ती वाक्ये’ पूर्णपणे संदर्भरहित व सांगोवांगीच्या गप्पांतून आली आहेत. ते इतिहास संशोधन अजिबात नव्हे तर ती एक विकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रतिभाशाली व्यक्क्तीमत्वाने स्वतः छत्रपतींवर ‘स्वातंत्र्याची प्रतिमा’ ही कविता लिहिली होती. जिचे ‘जयतु शिवाजी’ हे मराठी भाषांतर स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांनी केले आहे. शिवाय जे महापुरुष आज हयात नसल्याने आपल्या बाजूने खुलासा करू शकत नाहीत त्या महापुरुषांची बेधडक सांगोवांगीच्या गप्पांतून बदनामी करणं हे लोकशाही विरोधी आहे व ही लोकशाहीतील एक विकृती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगातली कोणतीही लोकशाही आणि त्यातून येणारे स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाही. ‘Statue of Liberty’ ज्या अमेरिकेत आहे तिथे सुद्धा हे स्वातंत्र्य अनिर्बंध उपभोगता येत नाही. तिथेही जगताना अनेक निर्बंध आहेत. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या एकमताने आणि जनतेच्या संपूर्ण पाठिंब्याने या पुस्तकावर बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ही बंदी घालण्यासाठी मी पुढाकार घेतला याचा मला नितांत अभिमान वाटतो, वाटणार आणि वाटत राहील याची नोंद कृपया त्या ‘राष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने’ आणि इतर सर्व लोकशाही प्रेमी नागरिक आणि माध्यमांनी घ्यावी ही नम्र विनंती.

माझ्या सर्व वाचकांना नमस्कार आणि प्रेम,
आबा

Sunday, July 18, 2010

Andhrababu Naidu

How strangely the politicians behave in this country? We all saw a good example of this yesterday in Mr. Andhrababu Naidu. He entered in Maharashtra state to see the dam project of Maharashtra at Babhli. Actually, it is been cleared by the Supreme Court that Maharashtra state is justifying with the water of Godavari river by constructing the dam at Babhli. Enough water supplies have given to Andhra Pradesh by Maharashtra government. But then also looking the elections ahead Telugu desam suprimo Mr. Andhrababu Naidu is on fast against the Maharashtra government strategies…!

Mr. Naidu came in Maharashtra with his all forces of MLAs to show their willingness to solve the water problems of Telugu people in Telangana region. The myth that is fitted in the minds of Indian politicians that our ‘netas’ are our true leader or caretaker is understood by common people now. Actually, Mr. Andhrababu is not caring about the people of Telangana. He is just making the political issues out of these situations. Few months before, 12 MLAs from Andhra has resigned from their post to support the separate Telangana state. Now, supplementary elections are ahead. In order to be famous Mr. Andhrababu is doing all these ‘nautanki’ here in Maharashtra. The Godavari water dispute is in Supreme Court from 2003 when Naidu was in Government. That time, he just neglected the problem. Now, in order to win the elections he is focusing himself on Telugu news channels.

He came in this state with his all MLAs with a lot of dry fruits and water bottles on Bislery to fight for ‘Godavari water’. After his arrest, he was kept in an AC room provided in ITI of Maharashtra government. He is a five star prisoner of Maharashtra. Due to this, it has forced to extend the admission process of ITI where he stayed. Students are facing a lot of discrepancies only because of tight z plus security provided to Andhra babu. We don’t know when the ‘nautanki’ of Mr. Andhra babu will finish. But I think he is a typical Indian politician who reads the minds of poor Indian people. After elections I am sure that he won’t look after the water distribution of Godavari river from Maharashtra.

I thank Mr. Andhra babu for entertaining the citizens…

Views about ISO

Yesterday, the meeting of ISO is held in our college. The institute is trying to get the ISO (International Organization for Standardization) certification this year. The aim of this meeting was to aware the faculty members about the ISO norms so they will prepare themselves accordingly.

Before this meeting, I have only heard the name of ISO in books as ell as in front of the names of certified institutes. Many of the computer hardware components and hardware related companies are also having the ISO certification. I came to know across this with the ISO-OSI reference model of networking. This was the first time I heard about the ISO. The process of ISO certification was started in the month of May.

The process of certification of ISO for education takes place several phases. I came to know about all of these yesterday. For each and every industry existing today is defined by the bounded standards of ISO. If we consider the education institutes, it is required to complete many of the standards including the academic and administrative resources. As a part of education process several requirements are required to be fulfilled by the institute. It has included with educational amenities, teaching environment, learning environments, institute premises, sports facilities, transport facilities, canteen facilities etc. these all the topics were discussed in the meeting. Several things are already in implementation and some of them are in process.

I think the ISO certification process will be a good experience in my teaching career. Hope we will do better…

खेळांतील गुणवाटप

मागील काही वर्षांपासून दर वेळी नवी ’एज्युकेशन पॉलिसी’ घेऊन आपले राज्य सरकार वादग्रस्त ठरले आहे. शिक्षण म्हणजे आपल्या राज्यासाठी एक गौण दुय्यम बाब आहे, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यामुळे चांगल्या ’एज्युकेशन पॉलिसी’ची अपेक्षा करणे, यापुढे चुकिचे ठरेल.

मागील वर्षी राज्यस्तरीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागाने खेळासाठी २५ गुण विद्यार्थ्यांना ज्यादा देऊ केले होते. या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांत भरघोस वाढ झाली. ती इतकी होती की, डझनभर मुलांना १०० पैकी १०० टक्के गुण प्राप्त झाले! भारताच्याच नव्हे तर पूर्ण जगाच्या इतिहासात एखाद्या मोठ्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी! या निकालाने एक मात्र सिद्ध झाले की, आपले ’स्टेट लेव्हल टॉपर’ विद्यार्थी हे खेळातही निपूण आहेत! ज्यांना १०० टक्के गुण आहेत, त्या सर्वांना खेळाचे पूर्ण गुण ’दान’ करण्यात आले आहेत. या मागचे गौडबंगाल आता हळूहळू काही शाळांनधून उघड होऊ लागल्याचे दिसून येते. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी हे गुण मुलांना मुक्तहस्ते प्रदान केले होते, अशी माहिती समोर आली आहे. शाळेचा निकाल वाढावा यासाठी जसे शिक्षक २० पैकी २० गुण प्रदान करतात तसेच खेळाचेही २५ पैकी २५ गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. शिवाय बहुतांश जणांनी याकरिता खोटी प्रमाणपत्रे सादर केली होती. ज्यांना हे गुण मिळाले नाहित, त्यांच्याकडूनच आता ही महिती उघड होत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दैनिक गांवकरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांनी पैसे घेऊन खेळाचे गुण प्रदान केले आहेत. एका पालकाच्या माहितीनुसार २५ गुणांसाठी हा दर ३००० रूपये होता! ’गांवकरी’ने ही एकंदरित उलाढाल कोटींच्या घरात गेल्याचे दर्शवून दिले आहे. यावरून एक सिद्ध होत आहे की, आता शिक्षकही ह्या भ्रष्टाचारी व्यवस्थेचे घटक बनू लागले आहेत. सुशिक्षित समाज तयार होण्यासाठी ही बाब पुढील काळात खूपच घातक ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात ’बेस्ट ऑफ फाईव्ह’चा वाद गेल्याने अकरावीचे प्रवेश महाराष्ट्रात रखडले होते. अखेर त्यावर कोर्टाने तोडगा काढला. आता ’आयसीएसई’च्या विद्यार्थ्यांनाही खेळाचे गुण त्यांच्या शाळेकडून देण्यात येणार आहेत. ’नवेनवे उपक्रम’ कोणत्या नव्यानव्या वाटा तयार करतात, हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय! दोन बोर्डांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या खऱ्याखुऱ्या विकासाकडे ध्यान देण्याची सध्या तरी कुणालाच गरज वाटत नाही. वादात आपलीच बाजू भक्कम आहे, याची प्रत्येकाला खात्री वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शिक्षणपद्धतीत आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळणार आहे, कोण जाणे? सुजाणांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पाल्याकडे व त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे ध्यान द्यावे, यातच खरे शहाणपण असेल...

Tuesday, July 13, 2010

शिक्षणाचा बट्ट्याबोळ


शिक्षणाचा बट्ट्याबोळ

दैनिक गांवकरी... दिनांक: १३ जुलै २०१०


Monday, July 12, 2010

गिव्ह मी फ्रीडम, गिव्ह मी फायर, गिव्ह मी रीझन, टेक मी हायर

काही वर्षांपूर्वी मी एक कथा वाचली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान सारख्या लहान देशाने रशियन सैन्याला पराभवाचे पाणी चाखवले होते. त्यामुळेच जपान अमेरिकेसारख्या देशावर आक्रमण करण्यास धजावला. जगाचा नकाशा जर पाहिला तर तुम्हाला ध्यानात येईल की, जपान व रशिया या दोन देशांमध्ये किती फरक आहे ते! या विजयामागचे कारण मी वाचले होते. ज्यावेळी जपानी सैन्य रशियनांच्या समोर युद्धासाठी उभे ठाकले होते तेव्हा रशियाशी युद्धाची कल्पनाच त्यांना करवत नव्हती. जवळपास सर्वच जण आता मरणालाच सामोरे जाणार, या स्थितीत युद्धाची तयारी करत होते. जपानी लष्करप्रमुखाला याची माहिती होतीच. तो अतिशय हुशार होता. त्याने सैन्यासमोर जपानी देवतेचा कौल आजमावयाचा ठरवला. छापा-काटा पद्धतीचा तो कौल होता. छापा पडला तर जपानी जिंकणार व काटा पडला तर ते हरणार असा कौल ठरला. लष्करप्रमुखाने जेव्हा कौल आजमावला तेव्हा तो जपानी सैन्याच्या बाजूने लागला. अर्थात, छापा पडून जपानी देवतेने त्यांचेच सैन्य जिंकणार अशी सूचना दिली होती. आपली देवताच आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर जपानी सैन्याचे मनोधैर्य कमालीचे उंचावले वे विजिगिषु भावनेने लढल्याने त्यांनी रशियनांना पराभवाचे पाणी चाखविले. प्रत्यक्षात, ज्या नाण्याने कौल लावला होता त्याच्या दोन्ही बाजुंस छापाच होता, हे केवळ जपानी लष्करप्रमुखास ठावूक होते. परंतु, कौल आपल्या बाजुने लागल्याचे पाहून जपानी सैन्य लढले व ते विजयी ठरले. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव अशाच पराभूत मनोवृत्तीतून झाला होता.

किंबहुना अशाच प्रकारची परिस्थिती कालच्या सामन्यातून मला दिसून आली. दक्षिण आफ्रिकेत झालेला यंदाचा फिफा विश्वचषक स्पेनने पटकावला. नेदरलॅन्डस संघ अखेर केवळ अंतिम सामन्यात पराभूत झाला. यावेळेसच्या विश्वचषकात विविध संघांच्या स्टार खेळाडूंपेक्षा एका साधारण ’ऑक्टोपस’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अंतिम सामन्यात विजयाचा कौल त्याने स्पेनच्या बाजुने दिला व अखेर तसेच झाले. स्पेन विजयी ठरला. खरं तर स्पेनचा संघ पहिलाच सामना स्वित्झर्लंड विरूद्ध पराभूत झाला होता व दुसरीकडे नेदरलॅण्ड्सचा संघ अंतिम सामन्यापर्यंत अपराजित होता. त्यामुळे त्यांचेच मनोधैर्य स्पेनपेक्षा वाढलेले असायला हवे होते परंतु, एका ऑक्टोपसने त्यांचे मनोधर्य खच्ची करण्यास मदत केली. परंतु, याने स्पेनचे वर्चस्व निश्चित नाकारता येत नाही. त्यांचा खेळ हा अंतिम सामन्यापर्यंत अप्रतिम होता परंतु, त्यांच्या बाजुने मिळालेला कौल त्यांना विजयी करण्यास निश्चित मदतगार ठरला, यात वाद नाही.

बर्लिनमधल्या या ऑक्टोपसला ’फेमस’ करण्यात जर्मन संघाचा मोठा वाटा होता. कारण, अंतिम सामन्यापूर्वी केवळ त्यांच्याच संघाच्या सामन्यासाठी ऑक्टोपसकडे कौल मागला जायचा. उपांत्य सामन्यात त्याने जर्मनीच्या पराभवाचा कौल दिल्याने जर्मनवासिय चिडले व त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. आज काहीजण म्हणतायेत की, यंदाचा वर्ल्डकप हा या ऑक्टोपसने हॅंण्डल केला होता!

मी ज्यावेळेस माझ्या ब्लॉगवर वर्ल्डकपसाठी ’पोल’ तयार केला होता. तेव्हा त्यात सर्व प्रमुख देशांसह स्पेनचे नाव समाविष्ट होते. परंतु, नेदरलॅण्ड्सचे नाव द्यायचे राहून गेले. या पोलवर दुसऱ्याच दिवशी स्पेनच्या नावाने एकच मत पडले. ते माझा मित्र अर्जुन साबळेने दिले होते. त्यानंतरच्या काही काळात केवळ ब्राझील व अर्जेंटिनाचीच मते वाढत गेली. स्पेनची मते तितक्याश्या वेगाने वाढली नाहित. परंतु, अंतिम सामन्यपूर्वी स्पेनची मते इतरांना मागे टाकून पुढे निघून गेली. कदाचित, ऑक्टोपसच्या भविष्यवाणीचा हा परिणाम असावा. अंतिम सामन्यापूर्वी या ’ऑक्टोपस’कडे केवळ दोनच संघांमधून एक विजयी संघ निवडायचा होता. परंतु, महिन्याभरापूर्वी आमच्या अर्जुनने ३२ संघांमधून स्पेनची विजेता म्हणून निवड केली होती. इतकी अचूक शक्यता ’नॉन-स्पॅनिश’ असणाऱ्या खूपच कमी व्यक्तींनी व्यक्त केली असावी. त्याबद्दल अर्जुनचे अभिनंदन व आभार. पुढच्या क्रिकेट विश्वचषकासाठी मला तुझ्या मताची प्रतिक्षा राहिल...!

यंदा स्पेनच्या रूपाने फुटबॉलला नवा विश्वविजेता मिळाला. आपल्या आशियायी देशांनी फारशी करामत दाखविली नाही. आशा करूया की, पुढच्या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात आपला देश काहितरी चांगले करेल.

Working for our nation.

While studying for engineering degree, first time I come to know about the education in foreign countries. Many of my classmates were preparing for the GRE i.e. Graduate record Examination hardly. They had decided to go to the foreign countries to pursue the next education (post graduate degree). I came along with the syllabus of GRE. It was actually very simple. I saw studied the syllabus for TOFEL too. It was not that much hard. I did not think to go for it, because I had not decided for any further education and which will be in foreign nations!

Today, many of my friends (classmates) are working in foreign countries like USA, UK, Australia, Japan and in Gulf nations too. Actually, working in foreign countries is like a 5 star job for our nationals. It is considered as a high profile job in India. So that is the reason why, Indians prefer to go outside, study there and pick a job there. Though, it is not a satisfactory job for him/her, they manage to work out there. Today, most of the employees in the field of software business and professionals, medical professionals and technology professionals in USA as well as UK are Indian nationals.

I worked out with a study nearly a half year ago. Indian government spends several thousands of money for the higher technical education only. The aim of this spending is to create professionals technocrats who work for the country and serve it. Government also spends the same amount of money for primary education. But, after all this most of the technocrats prefer to go in foreign and work there. Actually, they don’t like the ‘system’, that is here in India. They think that what our country has done for us? That is the general question in minds for young generations from India. The money and resources spent by government alliances was the part of education provided to the young engineers. They just forget it and dam the ‘system’ here in India.

The government is actually spending huge amount of money in education in Indian Institute of Technology, National Institute of Technology, Indian Institute of Management and all other government aided colleges in India. But the graduate from these institutes does not think about this. They used to go to foreign countries to serve them only because of wrong mindset created. Bulk amount of technical workforce of India is working to serve the foreign nations. Only due to this, we are not progressing with pace as it is expected. You can learn the technology in foreign countries but at last serving in our nation is an issue of morality for us. So this should be mandatory for all of us to work for our nation. If you are PIO or NRI then does not matter for this nation. NRIs or PIOs should be countless for India. But at least the Indian nationals technocrats must think to work in India only.

Wednesday, July 7, 2010

महाराष्ट्र देतो किती...?

संदर्भ: दैनिक सकाळ (दि. ७ जुलै २०१०)


महाराष्ट्राच्या दृष्टिने अस्मितेचा भाग बनलेला कर्नाटक सीमाप्रश्‍न गेली पाच दशके धगधगतो आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (सात जुलै) केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात केंद्राने "बेळगावर आणि परिसर हा कर्नाटकचाच भाग आहे,' असे ठामपणाने म्हटले. अर्थातच, सीमावादावर न्यायालयाचा निर्णय अंतिम असणार आहे. प्रश्‍न उरतो तो असा, की देशाच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राकडे केंद्र दुजाभावाने पाहते का...?

महाराष्ट्राचे खरेच किती योगदान आहे भारताच्या प्रगतीत यावर ही अत्यंत संक्षिप्त नजर...

भारताच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा:

भारतातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा १९.१ टक्के वाटा
महाराष्ट्रातून १५,२१० मेगावॅट वीज निर्माण केली जाते.
महाराष्ट्राची लोकसंख्या ९६.८८ कोटी (देशाच्या ९.४ टक्के)
महाराष्ट्राचे क्षेत्र ३,०८,००० स्के. किमी. (देशाच्या १० टक्के)
देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक.
भारतात जमा होत असलेल्या एकुण करापैकी (टॅक्‍स) महाराष्ट्रातून ४० टक्के कर जमा होतो
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ७२२ अमेरिकन डॉलर आहे. तर देशाचे ५२१ डॉलर
उद्योगधंद्यांमध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ४२७ डॉलर, तर भारताचे १९८ डॉलर
भारतात सर्वाधिक आनंदीत राज्य महाराष्ट्र असून, आनंदीत नागरिक असलेल्या शहरांमध्ये पुणे, मुंबई आणि नागपूर यांचा नंबर लागतो
महाराष्ट्राची भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर
आर्थिक उलाढालीबाबत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर आहे. तर रोजगाराच्या बाबतीतही दुसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रात ७७ टक्के लोकसंख्येत साक्षरता
२ आंतरराष्ट्रीय दर्जाची समुद्रातील बंदरे आणि ३८ राज्यस्तरीय बंदरे
३ आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे, ४ देशांतर्गत उड्डाणे होणारी विमानतळे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हवाई वाहतूकीने जोडण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा देशाच्या एकूण रस्ते वाहतुकीत ११ टक्के आणि रेल्वे वाहतुकीत ९ टक्के वाटा
गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रातील ८,२०० कंपन्यांची संख्या २६,६०० एवढी झाली आहे.
परदेशी कंपन्यांची भारतात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात १३.६ बिलियन डॉलर
टाटा, बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स या देशातील तीन महत्त्वाच्या कंपन्यांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते.

Sunday, July 4, 2010

थुंक्यांसाठी चार कोटी

आपल्या देशाला घाण करण्यात सगळ्यात जास्त मोठा वाटा हा आपले राजकारणी व रत्यावर इकडे तिकडे थुंकणाऱ्या लोकांचा आहे, यात शंका नाही. आपले राजकारणी निर्लज्जच असल्याने व त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत बरेच काही लिहून झाले असल्याने त्यात आणखी काही लिहिण्यात मजा नाही.

परवाच ’सकाळ’मध्ये एक बातमी वाचली. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये आता डबे स्वच्छ करण्यासाठी एका खासगी कंपनीला दोन वर्षाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन तब्बल चार कोटींपेक्षा जास्त रक्कम या कंपनीला अदा करणार आहे. शिवाय रेल्वेचा एक डबा धुण्यासाठी पाचशे लिटर पाणीही लागणार आहे. रेल्वेचे डबे घाण करण्यात प्रामुख्याने गुटखा किंवा अन्य चघळण्याचे पदार्थ खावून थुंकणाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजेच गुटखा खावून थुंकलेले साफ करण्याकरिता आता दोन वर्षात रेल्वे प्रशासन चार कोटी रक्कम खर्च करणार आहेत! पण, हे डबे साफ झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच थुंकणारे तो डबा घाण करण्यात सज्ज होतील, यात वाद नाही. म्हणजेच रेल्वे प्रशासन दरवर्षी दोन कोटी फुकट घालविणार आहे!

आपल्या देशात सार्वजनिक मालमत्ता म्हणजे गुटखा खावून थुंकणाऱ्यासाठी एक हक्काची जागा असते. केवळ रेल्वेच नाही तर सर्वच सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा, स्थानके ही थुंके लोकांनी घाण केलेली आहेत. राज्य बससेवा, शहर बससेवा व रेल्वेमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गुटखा खावून थुंकल्याचे दिसून येते. पुड्यांमध्ये मिळणाऱ्या ह्या गुटख्यावर काही वर्षांपूर्वी आपल्या राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बंदी घातली होती. परंतू, थोड्याच दिवसांत त्या गुटख्याचे नाव बदलून वेगळ्या नावाने व निराळ्या प्रकारच्या पुडीत तो विक्रीस येवू लागला. त्यामुळेच या गुटख्याला आवर घालणे कठीण आहे, हे लक्षात आल्याने शासनानेही त्याकडे नंतर फारसे लक्ष दिले नाही. चौकाचौकात अतिक्रमित जागेवर थाटलेली टपरीसदृश दुकाने याच गुटख्याच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. व आपल्या देशात चघळण्याचे पदार्थ खाणारा एक मोठा शौकिनवर्ग तयार झालेला आहे. या शौकिनांची खोड मोडणे आगामी काळात एक कठीण काम आहे.

आमचे थुंकेबहाद्दर केवळ थुंकण्यावरच थांबत नाहीत तर गुटख्याच्या पुड्याही ते सरळ रस्त्यावर फेकून देतात. आपल्या रस्त्यांवर व सार्वजनिक बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर रस्त्यावर पडलेल्या पुड्यांची पाकिटे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शहर घाण करण्यात याच पुड्यांचा एक मोठा वाटा झाला आहे. एका पुडीने मिळणारा आनंद आपले पूर्ण शहरच घाण करत आहे, याची जाणीव गुटखा खाणाऱ्यांना निश्चितच नाही. सध्या तरी गुटखा नावाच्या या पदार्थावर बंदी घालणे अवघड दिसते. कोणीतरी या पुड्यांमध्ये जुलाबाचे औषध टाकावे, म्हणजे हा प्रश्न थोडा का होईना आटोक्यात येण्याची शक्यता वाटते!

या वर्षीचे टॉप टेन

’नटरंग’ या मोठ्या म्युझिकल हिट चित्रपटाने या वर्षीची सुरूवात झाली. मागील वर्षी अजय-अतुलच्या संगीताने मराठी चित्रपटसृष्टीची वेगळी वाटचाल सुरू झाली होती. या वर्षीची सुरूवातच दणकेबाज लावण्या असणाऱ्या चित्रपटाने झाली. यानंतर प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट सांगितिक प्रयोग घेऊन आल्याचे दिसले. मराठी चित्रपटांत आता गाणी केवळ सोयीची म्हणून टाकली जात नाहित. त्यांना तांत्रिकतेची जोड मिळू लागली आहे. यंदा प्रथमच मराठी संगीतकाराला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्याचेच हे फलित असावे. यावर्षी मराठी चित्रपटांतील गायक-गायिकेलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी संगीत बदलले आहे, हे मात्र निश्चित! त्याची प्रचिती मागील सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांतील संगीतावरून दिसून आली. मराठी गीतांना लोकप्रिय करण्यात संगीतकारांबरोबरच गीतकार व गायकांचाही मोठा सहभाग दिसून येतो.
यंदाच्या अर्ध्या वर्षात तयार झालेल्या मराठी गीतांमधील टॉप टेन गीते मी निवडून काढली आहेत. ती खालीलप्रमाणे...

१. बावरा
प्रणयगीत
चित्रपट: क्षणभर विश्रांती
गायक: ऋषिकेश कामेरकर, अवधूत गुप्ते, जान्हवी अरोरा, शिल्पा पै
संगीत: ऋषिकेश कामेरकर
गीत: गुरू ठाकूर

२. भिजून गेला वारा
प्रणयगीत
चित्रपट: इरादा पक्का
गायक: क्षितीज तारे, निहिरा जोशी
संगीत: निलेश मोहरीर
गीत: अश्विनी शेंडे

३. का कळेना
प्रेमगीत
चित्रपट: मुंबई पुणे मुंबई
गायक: स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
संगीत: अविनाश-विश्वजीत
गीत: ऋषिकेश रानडे

४. कधी तू
प्रेमगीत
चित्रपट: मुंबई पुणे मुंबई
गायक: ऋषिकेश रानडे
संगीत: अविनाश-विश्वजीत
गीत: ऋषिकेश रानडे

५. सांग ना रे मना
प्रेमगीत
चित्रपट: झेंडा
गायक: स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत
संगीत: अवधूत गुप्ते
गीत: अवधूत गुप्ते

६. वाजले की बारा
लावणी
चित्रपट: नटरंग
गायिका: बेला शेंडे
संगीत: अजय-अतुल
गीत: गुरू ठाकूर

७. कधी कधी
विरहगीत
चित्रपट: इरादा पक्का
गायक: जावेद अली
संगीत: निलेश मोहरीर
गीत: अश्विनी शेंडे

८. भीमरूपी महारूद्रा
भक्तीगीत
चित्रपट: हुप्पा हुय्या
गायक: स्वप्नील बांदोडकर
संगीत: अजित परब
गीत: प्रकाश चव्हाण

९. अप्सरा आली
लावणी
चित्रपट: नटरंग
गायक: बेला शेंडे, अजय
संगीत: अजय-अतुल
गीत: गुरू ठाकूर

१०. विठ्ठ्ला कोणती झेंडा घेऊ हाती
शीर्षकगीत
चित्रपट: झेंडा
गायक: ज्ञानेश्वर मेश्राम
संगीत: अवधूत गुप्ते

Saturday, July 3, 2010

सप्तचिरंजीव

हिंदू पुराणाप्रमाणे हिंदूंमध्ये सात अशा व्यक्ति आहेत की, ज्या अमर आहेत. त्यांना कधीच मरण नाही. या सात जणांपैकी खूप कमी जणांची ते चिरंजीव असल्याविषयी आपल्याला माहिती आहे. रमेश मुधोळकर यांच्या ’सप्तचिरंजीव’ या पुस्तकामध्ये त्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. खालील श्लोकामध्ये या सात जणांची नावे येतात.

अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमान्‌ च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तेते चिरजीवनः ॥

सातही जण वेगवेगळ्या गुणांमुळे व कारणांमुळे अमर झाले आहेत. हनुमानाविषयी तर सगळेच जण जाणून आहेत. अनेकांनी तर मारूतीला प्रत्यक्ष पाहिल्याचेही सांगितले आहे. हे सर्व सप्तचिरंजीव खालीलप्रमाणे-















आत्मघात आणि ’घाना’घात


विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली असताना संभाव्य विजेते म्हणल्या जाणाऱ्या ब्राझीलने स्वत:चा आत्मघात करून घेऊन विश्वचषकाची रंगत काहिशी कमी केली. कालच ब्राझीलने स्वयंगोल पदरात पाडून घेतला व विश्वचषकाला बाय-बाय केले. दुसरीकडे ’घाना’ या आफिकन वाघाला लॅटिन अमेरिकेच्या उरूग्वेने बाहेरची वाट दाखवून बऱ्याच वर्षांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरित प्रवेश केला. पहिल्या विश्वचषकाचे आयोजक व विजेते असणाऱ्या उरूग्वेने विश्वचषक विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. एक ब्राझीलसारखा तगडा लॅटिन अमेरिकन देश जरी विश्वचषकातून बाहेर पडला तरी अजुन उरूग्वे व अर्जेंटिनाने चालू ठेवलेली वाटचाल निश्चितच आनंददायी आहे.

ब्राझीलचा कालचा खेळ पहिल्या सत्रात चांगला झाला. नेहमीच आक्रमणावर भर देणाऱ्या ब्राझीलने कालही हाच डावपेच अवलंबला होता. पहिल्या सत्रात तो यशस्वी झाला. परंतु, द्वितीय सत्रात ब्राझीलकडून स्वयंगोल झाल्याने नेदरलॅन्ड्सचा आत्मविश्वास उंचावला व त्याचा परिणाम दुसऱ्या गोलात झाला. संभाव्य विजेत्यांची ही खेळी फोल ठरली. नेदरलॅन्ड्सचे मन:पूर्वक अभिनंदन! परंतु, लॅटिन अमेरिकेचे उरूग्वे व अर्जेंटिना अजुनही आपल्या खेळीने पुढे चाललेले आहेत. अशी आशा वाटते की, या वेळी विश्वचषक येथील संघच पटकावून नेईल.
दुसऱ्या सामन्यात घानाला उरूग्वेने बाहेर काढले. खरं तर विश्वचषकाच्या या फेरिपर्यंत घानाला कोणी जमेत धरले नव्हते. परंतु, त्यांनी छान खेळ केला. उरूग्वे व घानाचे नाव आपण भारतीय फक्त अशाच चार वर्षांतून एकदाच ऐकत असावेत...!