Sunday, August 26, 2012

Bits about Nashik


Nashik City- Godavari
The city of Nashik is situated on the bank of South Ganga River that is Godavari. It is also known as Gautami Ganga. It is mythological capital of Maharahstra and one of the historical and cultural city in India. It is impossible to put the importance of Nashik here on the blog. I am giving small information, which is unknown to the citizens of the Nashik also.

Changed names of Nashik from Mythological era-

-      Panchwati
-      Padma Nagar
-      Dakshin Kashi
-      Godakshetra
-      Harihar Kshetra
-      Trikantak
-      Janasthan
-      Nashik
-      Gulshanabad
-      Nashik.

Many people wrongly pronounce Nashik as Nasik also.

Nashik has nine hills whose peaks’ names are-

-      Ganesh Tek
-      Dingar Tek
-      Mhasrul Tek
-      Juni Gadhi
-      Konkani Tek
-      Jog Wada
-      Kajipura
-      Chitraghanta
-      Durgawadi

Nashik city has eleven doors from thousand years-

-      Delhi Darwaza
-      Naav Darwaza
-      Malhar Darwaza
-      Trimbak Darwaza
-      Asra ves Darwaza
-      Sati Darwaza
-      Ketki Darwaza
-      Bhagur Darwaza
-      Sadar Darwaza
-      Kajipura Darwaza
-      Bhadak Darwaza  

Down to earth


Success is always most enjoyable part of one’s life. We always seek for the success in every effort that is taken. But, very few people get their target achieved! I have seen many big personalities achieved a great success in life but very few are there, who are still “down to earth” after their achievement.
When we are targeting to climb the mountain of success, we always look forward but very few still knows that there was a ground level also from where we started climbing. Many one only goes forward and forward only and does not look back. They are not proud of their success but have a strong ego about it. About 90 percent successful people are of this type. But remaining 10 percent I thought are real successful people.
I have seen many such personalities who look down to earth after their grand successful achievement. Rahul Dravid, Sachin Tendulkar, Aamir Khan, Dr. A. P. J. Abdul Kalam are among such great personalities. Everyone has capability to achieve the success but very few recognize it. This recognition leads us to achieve our target. The people who know that everyone has potential to do any kind of task, they do not underestimate to others. Here human tendency plays one of the most vital roles to decide the activeness of the person. The personalities that I have mentioned above are really humble and not having ego of their success. They look themselves as a common man who has capability to do anything. The capability to look down to earth makes us a great human kind.
It is one of the great qualities of the person…





Wednesday, August 8, 2012

बघ उघडुनि दार…


नाशिकच्या रेडिओ मिर्चीमध्ये मागील आठवड्यापासून ’भारतीय’ या आगामी चित्रपटातील एक गीत ’एक्सक्लुसिव्हली’ ऐकवले जात आहे. प्रदर्शनापूर्वी मराठी चित्रपट गीत खाजगी रेडिओवर मी पहिल्यांदाच ऐकले. ’भारतीय’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील हे गीत म्हणजे मराठी भजन आहे. रूपकुमार राठोड यांच्या आवाजातील इतके उत्तम गीत मी त्यांच्या ’बॉर्डर’ या चित्रपटानंतर पहिल्यादाच ऐकले. ३ ऑगस्टला ’भारतीय’ची सीडी आल्यावर हे गीत मला पुन: पुन्हा ऐकायला मिळाले. अत्यंत उत्कृष्ट शब्दरचना व चाल यांच्या जोडीला उत्तम गायकाची साथ लाभल्याने हे गीत स्वरणीय झाले आहे.
शोधुन श्री ना जीव हा तरी,
साद तुला ही पोहचल का?
दारोदारी हुडकल भारी,
थांग तुला कधी लागंल का?
श्याममुरारी, कुंजबिहारी,
तो शिरहारी भेटल का?
वाट मला त्या गाभाऱ्याची,
आज कुणीतरी दावल का?

बघ उघडुनि दार
अंतरंगातला देव गावल का?

तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो,
नाचे रंगुन संतांच्या मेळ्यात जो,
तुझ्या-माझ्यात भेटल साऱ्यात तो,
शोध नाही कुठे ह्या पसाऱ्यात जो,
रोज वृंदावनि फोडतो घागरी,
तोच नाथाघरी वाहतो कावडी,
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी,
बाप झाला कधी, जाहला माऊली,
भाव भोळा जिथे, धावला तो तिथे,
भाव नाही जिथे, सांग धावल का?

बघ उघडुनि दार
अंतरंगातला देव गावल का?

राहतो माऊलीच्या जिव्हारात जो,
डोलतो मातलेल्या शिवारात तो,
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो,
दाटुनि तोच आभाळी ओथंबतो,
नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी,
होई काठी कधी आंधळ्याच्या करी,
घेऊनि वाट येतो, किनाऱ्यावरी,
तोल साऱ्या जगाचाही, तो सावरी,
राहतो तो मनी या जगी जीवनी,
एका पाषाणी तो सांग मावल का?

बघ उघडुनि दार,
अंतरंगातला देव घावल का?

चित्रपट: भारतीय (देविशा फिल्म्स).
गीतकार: गुरू ठाकुर.
संगीत: अजय-अतुल.
गायक: रूपकुमार राठोड.

Tuesday, August 7, 2012

भुसावळचे मराठी लोक हिंदी का बोलतात?

गेल्या दोन वर्षांपासून मला पडलेला प्रश्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून विचारू इच्छितो. खरं तर मागील वर्षीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या परिक्षेत मी हा विषय संशोधनासाठी घेणार होतो. पण, योग जुळुन आला नाही. हा प्रश्न काय, ते या ब्लॉगच्या शिर्षकातून तुम्हाला समजले असेलच. तरीही थोडक्यात सांगतो.
नव्या तंत्रज्ञानामुळे मराठी सारख्या भाषा बुडणार, असे काही वर्षांपासून ऐकत होतो. पण, जसजसे इंटरनेटने संवाद साधू लागलो, तसतसे समजू लागले की, याच इंटरनेटमुळे मराठी भाषा अधिक पसरत आहे व अधिक समृद्ध होत आहे. युवा पिढी आपल्या मातृभाषेच्या बाबतीत खूप संवेदनशील दिसते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात राहणारे युवक इंटरनेटद्वारे मराठीतून संवाद साधतात व मुळातच आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात, ही बाब मला सुखावह वाटली. त्यामुळे माझा मातृभाषेसाठी काहीतरी करण्याचा उत्साह द्विगुणित झाला.
उत्तर महाराष्ट्रातील अर्थात खानदेशातील अनेक जणांशी माझा चांगला स्नेह आहे. इथे बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे ’अहिराणी’ होय. मराठी भाषेसारखा गोडवा याही भाषेत दिसून येतो. खानदेशातीलच जळगांव जिल्ह्यात भुसावळ हे गांव आहे. अर्थात हे गांव याच मराठी मातीतील आहे. पण, गेल्या तीन-चार वर्षांत इथल्या सर्वच मराठी नावाच्या लोकांना मी प्रामुख्याने उत्तर भारतीय पद्धतीच्या हिंदीत बोलताना पाहिले आहे. विशेष म्हणजे ते अत्यंत अस्खल्लितपणे ही भाषा बोलतात. अनेकांना ’मराठी किस चिड़ियां का नाम है?’ हे माहितच नसावे! त्यामुळे माझी उत्सुकता अधिक ताणली गेली. एकिकडे गेली साठ वर्षे बेळगावचे मराठी बांधव आपली भाषा व संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायेत. असे असताना हा काय वेगळा प्रकार आहे? याचा उलगडा मला झाला नाही.
काहींनी मला सांगितले की, हे गांव ’बॉर्डरच्या’ जवळ आहे. पण, मग बेळगांव वा गोव्यातल्या मराठी बांधवांविषयी आपल्याला काय म्हणता येईल? या प्रशाचे उत्तर मात्र शोधता आले नाही. असेही नाही की, पानिपत प्रमाणे हे शहर पूर्णपणे वेगळ्याच राज्यात आहे. पानिपतच्या मराठी लोकांची भाषा बदलू शकते, ही बाब समजू शकतो. मी गूगलवरही ह्या शहराची माहिती बघितली व प्रथम खात्री करून घेतली की, हे शहर महाराष्ट्रातच आहे! विकिपीडियावर तर इथल्या मराठी शाळांची यादीच दिली गेली आहे. त्यानंतर मात्र मी बुचकळ्यात पडलो. आपल्याकडे जशी मुले इंग्रजी माध्यमातून शिकुन मराठी बोलतात, तसे तिथे मराठी माध्यमातून शिकुन हिंदी बोलतात, असे तर असेल ना? याची शक्यता मला कमीच वाटते. ’मुंबई’सारखी परिस्थितीही इथे नाही. “Why Bhusawal Marathi people speaks Hindi?” असे गूगलमध्ये टाकून मला योग्य निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे मी शेवटचा पर्याय म्हणून हा ब्लॉग लिहायचे ठरविले. माझ्या मातृभाषेच्या बाबतीत कोणतीही शंकेचे निरासन करणे, मी माझे आद्य कर्तव्य समजतो. त्यामुळे वाचक मला मदत करतील, याची आशा वाटते. कोणाला माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माहित असल्यास कृपया ’कमेंट’मध्ये लिहावे.