Monday, January 4, 2010

एकाच वेड्याची कथा... ’थ्री इडियट्स’


’थ्री इडियट्स’..... मी आजवर पाहिलेला सर्वोत्तम हिंदी चित्रपट, याच शब्दात त्याचे वर्णन करू शकतो. जगाची प्रगती ही वेड्या लोकांमुळे होते, शहाण्यांमुळे नव्हे...! कारण, शहाणी लोकं दुसऱ्याची प्रगती करण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते त्यास खीळ घालण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करतात. हे वैश्विक सत्य या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले.
आमीर खानचा व राजकुमार हिरानीसारख्या दमदार दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली चित्रपट असल्याने त्याविषयी उत्सुकता होतीच. मागील वर्षी आमीर खान हा चित्रपट करीत असल्याचे समजले व तब्बल एका वर्षाने तो प्रसिद्ध झाला. या चित्रपटाने सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ’थ्री इडियट्स’ इंजिनियरींगवर आधारीत असल्याने ते एक वेगळॆच थ्रील अनुभवायास मिळाले. आमीर खानने रंगवलेला ’रणछोडदास चांचड’ खूप अप्रतिम होता. वाटले, आपणही त्याच्यासारखेच असायला हवे. जोडीला असणाऱ्या ’शर्मन जोशी’ उर्फ राजू रस्तोगी व आर माधवन उर्फ ’फ़रहान कुरेशी’ यांनीही सुंदर अभिनय केला आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग मनाला चटका लावून जातात तर काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. त्याचे श्रेय चेतन भगत सोबतच लेखक अभिजात जोशी, दिग्दर्शक राजकुमार हिरानी व आमीर ख़ान यांनाच आहे. चित्रपटाने ज्या गोष्टी शिकविल्या त्यातील काही मी इथे नमूद करत आहे.
- आपल्याला ज्यात खरा रस आहे अश्याच प्रकारचे शिक्षण घ्यावे. नाहितर आयुष्यभर पस्तावावे लागेल.
- अनेकजण पैसाच आयुष्यात महत्वाचा मानतात. काही अंशी हे सत्य असले तरी ती प्राथमिकता कधीच नसावी.
- यशाच्या मागे धावू नका, आपले काम ते कोणतेही असेल; मात्र मन लावून करा. तर यशच तुमच्या मागे धावेल.
- आपल्या अपेक्षा आपल्या अपत्यांवर लादू नका. त्यांना हव्या त्या क्षेत्रात करीयर करू द्या, तिथेच त्यांना खरे यश मिळेल.
- जगात कोणीही सामान्य नसतो. फक्त आपल्यातील क्षमता ओळखण्याची कुवत आपल्यात तयार व्हायला हवी.
- थियरॉटिकल इंजिनियर होण्यापेक्षा प्रॅक्टीकल इंजिनियर होणेच अधिक फायद्याचे असते.
- आपल्याला जीवनात काय करायचे आहे, हे आधीच निश्चयाने ठरवा. नंतर पैसा भेटेल त्या वाटेला जाणे म्हणजे पूर्ण मूर्खपणाचे आहे.
- अभ्यासामध्ये केवळ पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. ती गोष्ट समजून घेता यायला हवी. अन्यथा अभ्यासाचा बलात्कार व्हायचा.
- खरा मित्र आपल्या मित्रांना योग्य मार्गदर्शन करतो.
चित्रपटाचे नाव ’थ्री इडियटस’ असले तरी, तिन्ही इडियट्स मधुन ’रॅंचो’ नावाच्या एका इडियट ने खरी बाजी मारली आहे. त्याच्यावर आधारले असलेले चित्रपटातील एक गाणे इथे लिहित आहे.

बहती हवा सा था वो,
उडती पतंग सा था वो,

हमको तो राहेंही चलती,
वो ख़ुद अपनी राह बनाता,
गिरता संभलता मस्तीमें चलता था वो,

हम को कल की फ़िक्र सताती,
वो बस आजका जश्न मनाता,
हर लम्हे को खुल के जीता था वो

सुलगती धूप में छाव के जैसा,
रेगिस्तान में गाव के जैसा,
मन के घाव में मरहम जैसा था वो,
हम सहने से रहते कुंवे में,
वो नदियां में गोते लगाता,
उलटी धारा चीर के तैरता था वो,

बादल आवारा था वो,
यार हमारा था वो........

2 comments:

  1. va va.. what a review...
    kay chitrapatane shikavalela pahila point tuzyashi tar related nahi na :P Just kidding... nice review :)

    ReplyDelete
  2. Hello,

    I know tushar... He is also one of the idiots.... probably he is like Aamir Khan..

    It is....!
    All the best....

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com